छ.शिवाजी राजे यांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांन्द्री येथे जल्लोषात स्वागत
कन्हान,ता.७
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल द्वारे काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य जागरण यात्रेचे कांद्री परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव राज्याभिषेकाला ३६५ वर्षे आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे पूर्ण झाल्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल रामटेक विभाग द्वारे शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा शुक्रवार (दि.६) ऑक्टोंबर रोजी कोराडी येथुन भ्रमण करीत चनकापुर, खापरखेडा, पारशिवनी, पालोरा, आमडी फाटा मार्गाने होत नागपुर-जबलपुर चारपदरी राष्ट्रीय महामार्गा ने भारत माता चौक कांद्री येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आगमन झाले.

विविध सामाजिक, राजकीय संस्था आणि नागरिकांनी फुलाच्या वर्षावाने, फटाके फोडुन जल्लोषात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद नागपुर माजी अध्यक्षा सौ.रश्मीताई बर्वे, कांद्री ग्रा.माजी सरपंच बलवंत पडोळे, माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सभापती करुणाताई भोवते, नरेश बर्वे, अतुल हजारे आदी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले. आयोजक अरुणजी चाफले, जयराजगी नायडु, अनिकेत चिखलखर, योगश जालंदर आदींनी भगवा दुप्पटा घालुन भव्य स्वागत केले.





